Now a days lot of problems created with humans health,farm. In that case we require cow farming, zero budget natural farming, organic farming with the help of Mr. Subhash Palekar and Rajiv Dixit.
रासायनिक शेतीला विरोध करणारे पाळेकर 12 वर्षं रासायनिक शेतीच करत होते.
कृषी विद्यापीठात MSc करत असलेल्या पाळेकरांनी 1973 साली शिक्षण सोडलं आणि
शेतीतल्या प्रयोगाला सुरुवात केली.
बारा वर्षं शेती केल्यानंतर 1985नंतर त्यांच्या शेतीचं उत्पादन घटलं, आणि त्याच्या कारणांच्या मुळाशी जायचं त्यांनी ठरवलं.
पाळेकर
रासायनिक शेती करत होते, तो काळ भारतातल्या हरित क्रांतीचा सुवर्णकाळ
होता. "मी अनेक कृषी तज्ज्ञांना विचारत फिरत होतो, की जर हरित क्रांतीचं
तत्त्वज्ञान खरं आहे, तर मग उत्पादन का घटत होतं?"
प्रतिमा मथळा
दिलीप राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी झिरो बजेट शेती सुरू केली.
"जंगलात कोणतीही मशागत न करता झाडाला उत्तम प्रतीची
फळं लागतात, हे सत्य आहे. जंगलामध्ये मानवाच्या उपस्थितीशिवाय ही निसर्गाची
स्वत:ची स्वयंपूर्ण व्यवस्था आहे, मग ती आपण का स्वीकारू नये, असा प्रश्न
मला त्यावेळी पडला."
"निसर्गातलं कोणतंही पान तोडा आणि प्रयोगशाळेत
तपासा. त्यात नायट्रोजन, फॉस्फेट, अशा कोणत्याही जीवनद्रव्याची कमतरता
नसते. मी दोन वर्षं जंगलातील वनस्पतींचा, गळलेल्या पानांचा, त्याखालील
जीवाणूंचा, बुरशीचा प्रयोगशाळेत आणून अभ्यास केला. त्यानंतर 1988 साली
त्यांनी गावात येऊन आपल्या शेतात प्रयोग सुरू केले."
पाळेकर सांगतात,
"1988 ते 2000 हा प्रयोगाचा काळ होता. या प्रयोगांदरम्यान पत्नीने घर
चालवण्यासाठी दागिने विकले होते. माझे नातेवाईक आणि मित्र दूर गेले. एक
प्रकारचा अघोषित बहिष्कार मी अनुभवत होतो. लोक मला पागल म्हणायचे."
याच काळात पाळेकरांना शेतीतलं मर्म सापडलं, "या जमिनीत आणि निसर्गात सगळं आहे."
तिथूनच
झिरो बजेट शेतीचं मॉडेल उभं राहिलं. संकरित (हायब्रीड) बियाणांचा कमीत कमी
वापर, पारंपरिक बीज वापरून रोपं तयार करण्यावर त्यांनी भर दिला, आणि
रसायनविरहित कीटकनाशकं त्यांनी विकसित केली.
0 comments:
Post a Comment